Skip to main content

माझी वाचनकथा

शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला..

सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;)
...अथवा पुढे वाचा
(माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे).
वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्याची चिरफाड वाटे. नुसतंच वाचत जावं आणि त्यातच रमून जावं असं साधं सोपं आयुष्य असतं तर काय मजा आली असती! अनुभवाने सांगतोय, दहावीपर्यंत हे नशीब नव्हतं, पण अकरावी-बारावीत मराठी नव्हतं तरीही मी युवकभारती वाचून काढली, आणि त्या वाचनाचा आनंद अवर्णनीयच होता.
खर तर कुठल्याही वाचनाचा आनंद हा असाच असतो. ज्ञान मिळवण्यासाठीदेखील वाचावं लागतं, पण मग 'फक्त बर वाटतं' म्हणून जर एखादा वाचत असेल तर त्यातही काही चुकीचं नाही.
समीक्षक, परीक्षक लोकांची मला कधी कधी कींव येते, एवढं प्रचंड वाचन, पण त्यातून काही आनंद मिळतो की नाही देव जाणे.

तर मग फक्त बरं वाटावं म्हणून वाचत गेलो आणि पुस्तकांनी पण अगदी मन मोकळं केलं. काही पुस्तकांनी हसवलं, काहींनी रडवलं, काहींनी घाबरवलं, काहिंनी अस्वस्थ केलं, काहिंनी भडकवलं आणि काहिंनी बहकवलं.. आणि आजही कोणतही पुस्तक चांगलं की वाईट हे एकाच गोष्टीने ठरत- 'त्याने मनाला हात घातला का?'

तर आता थोडंफार त्या माझ्या प्रिय पुस्तकांबद्दल..

१. नुकतेच विकत घेतलेले पुस्तक (६ महिन्यांपूर्वी).
बहिणाबाईची गाणी

२. वाचले असल्यास, पुस्तकाबद्दल थोडेसे
:)

३. आवडलेली प्रभाव टाकणारी ५ पुस्तके.
कार्यरत - अनिल अवचट
गाडगेबाबा - गो. नि. दा.
समग्र पु. ल.
पार्टनर - व.पु.
दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
श्यामची आई, फास्टर फेणे, विज्ञान-राक्षस
आमचा पण गाव/एरंडाचे गु-हाळ - चि.वि. जोशी
घरभिंती

४. वाचायची आहेत अशी ५ पुस्तके..
बरीच आहेत .. पण नावं आठवत नाहीत.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.
कार्यरत ह्या अनिल अवचटांच्या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रात अतिशय साध्या, पण तितक्याच प्रभावी समाजकार्य करणा-या अनेक व्यक्त्तींबद्दल आणि त्यांच्या संस्था/चळवळी/उपक्रमांविषयी लिहिलेले आहे.


मी ह्यांना खो देतो आहे..
वसुद
विंचुरकरी
विवेक

Comments

vasud said…
Hi Amit,tag बद्दल आभार, लिहून पूर्ण झाले आहे,
http://manaacha-shodh.blogspot.com/
thanks again
shashank said…
सही रे सही! छान लिहिले आहेस.

अवांतर - "पुस्तकनिष्ठांची मांदियाळी" संबंधीचा माझा लेख "काम चालू आहे" वर आहे.या लेखात दुसऱ्या ब्लॉगचा दुवा दिलेला आहेस.
amity said…
Thnx Shashya..
I modified the link now :)
borntodre@m said…
sahi lihile ahes Amya :)
Shilpa Datar said…
mala kho dilyabaddal thanx

Popular posts from this blog

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links Part I Part II काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा.. अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :( बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही.. मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो.. आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली. पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या

.... अवघे धरू सुपंथ

सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग.  त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक.  पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली