Skip to main content

मे महिना

शाळेत असताना माझा सगळ्यात आवडता महिना होता तो मे महिना! कारणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. निकाल लागलेला असल्याने पुढच्या वर्गात जाण्याची खात्री असायची, घरात सगळे नातेवाईक, पाहुणे असल्याने खेळायला/उनाडक्या करायला अख्खी टोळी असायची, त्यावेळी तरी पुढच्या वर्गांच्या शिकवण्या/संस्कार वर्ग/उन्हाळी शिबिरं असले काही प्रकार नव्हते आणि ह्या सगळ्याला असायची ती कोकणाची पार्श्वभूमी. आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद ह्यांचा रतीब, गाज ऐकत वेळेवर फिरणं, किल्ले बांधणं, शंख-शिंपले गोळा करणं, उकाड्याने हैराण झालो की एखादे काका/मामा आइस्क्रीम खायला देतील ह्या आशेवर राहणं, वळवाच्या पावसात चिंब होणं हे सगळं मनोसोक्त भोगायचे ते दिवस होते.

इतक्या वर्षांनंतर परत मे महिन्यात कोकणात जायची संधी मिळाली.

मारामारी करून कोड अप्रूव्ह करून घेतला आणि सरळ गोवा गाडी पकडून कणकवली गाठली. तसंही महिन्यातून एकदा जाणं होतंच, पण ते २, जास्तीत जास्त ३ दिवस. ह्या वेळी अख्खा आठवडा हातात होता. २ दिवस सिंधु-महोत्सव बघत आराम केला. कार्यक्रम/आयोजन चांगलं होतं पण मागच्याच आठवड्यात नाट्यमहोत्सवाची धमाल केलेल्या नाट्यवेड्या (नाट्यरसिक नव्हे) कणकवलीकरांना त्याचं तेवढ कौतुक नव्हतं.



बुधवारी सरळ बाईक काढली आणि जास्त काही विचार न करता कुणकेश्वरकडे निघालो.



राणेसाहेबांच्या कृपेने रस्ता संपूर्ण डांबरी होता आणि बराही होता. ५०-६० चा वेग कायम ठेवून गाडी चालली होती. ह्या वेळी एकदम कोकणाच्या पोटात शिरायचं होतं, वाटाड्या म्हणून बाबा बरोबर होते. नोकरीनिमित्त त्यांनी सगळा जिल्हा पालथा घातला होता, त्यामुळे सगळा भुलभुलैय्या त्यांना ठावूक होता.

देवगड तालुक्यात शिरतानाच समोर येतो तो जिकडे तिकडे पसरलेला कातळ, किंबहुना अख्खा देवगड तालुका हा एकच कातळ आहे अधूनमधून थोडीफार माती असावी. ना त्याच्यावर धो धो कोसळणा-या पावसाचा परिणाम होतो, ना तो दात ओठ खावून आदळणा-या अरबी समुद्राला भीक घालतो, पण जगप्रसिद्ध देवगड हापूसच्या गोडीला कारणही हाच कठोर कातळ आहे बरं. म्हणूनच प्रचंड मेहनत घेवून लोकांनी इथे मोठमोठ्या बागा केल्या आहेत. कुणकेश्वरचा रस्ता सोडून मधेच आम्ही ४ किलोमीटर पुढे पोखरबांवला गेलो.



इथे काही पांडवकालीन कुंडं आहेत आणि त्याच्या बाजूलाच शंकराचं, गणपतीचं मंदिर आहे. रखरखत्या उन्हातही कुंडात ब-यापैकी पाणी होतं. खाली उतरून गेलं की माणूस वेगळ्याच जगात पोचतो. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आणि कुंड/छॊटी गुहा ह्यांमुळे एक गारवा. आत्ता आत्ता मंदिराच बांधकाम चालू आहे. नाहीतर मागे ७-८ वर्षांपूर्वी गेलेलो तेव्हापर्यंत पांडवकालापासून काही बदल नव्हता ;).



तिथून मग परत कुणकेश्वराचा रस्ता पकडला. डोंगरावरूनच निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर, हिरव्या झाडीने वेढलेल्या
कुणकेश्वराचा पांढरा कळस दिसतो. आणि मग १-२ किलोमीटर घसरत गेलो की श्री क्षेत्र कुणकेश्वर आपलं स्वागत करतं. देवाचं दर्शन घेतलं, 'देवा माझं कल्याण (मराठी बरं का, तमिळ नव्हे ;) ) कर' अशी प्रार्थना केली आणि किना-यावर गेलो. स्वच्छ पांढरी शुभ्र वाळू आणि लाल/काळे खडक. लोकं देखील फार नव्हती. बहुतेक सगळे भक्तच होते, पर्यटक जास्त कोणी दिसले नाहीत. गर्दी होती ती माडांचीच आणि गोंगाट फक्त लाटा आणि वा-याचा.

हे गावही फार लहान आहे. झाडांनी वेढलेली छोटी/छोटी कौलारू घरं, लाल माती आणि वळणावळणाचा रस्ता, एकूण वळणच कोकणी. जेवणासाठी छोटी-छोटी हॉटेलं आहेत, राहण्यासाठी मात्र फार जास्त सोयी नाहीत. देवस्थानाचा एक भक्तनिवास आहे तिथे ७०-८० लोकं, आणि मंदिरापासून थोडं दूर सरकारी पर्यटक निवास आहे तिथे थोडी लोकं एवढ्यांचीच व्यवस्था आहे. अनेक लोकांचं हे मोठं श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीला अफाट गर्दी असते. त्यावेळी मात्र गावकरी राहायची व्यवस्था करतात.


जवळच मीठमुंबरी आहे, तिथल्या किना-यावरून देवगडच्या (बंद) पवनचक्क्या दिसतात.



मग समुद्राकाठचा रस्ता पकडून दक्षिण दिशा पकडली. पुढचा टप्पा होता मिठबांव. वडील बरेच वर्ष तिकडे होते. माझ्याही काही सुट्ट्या तिकडे गेल्या होत्या. मिठबांवचा किनारा पण असाच शांत आणि स्वच्छ होता. इथे कुठलातरी उद्योगसमूह पंचतारांकित हॉटेल टाकणार होता, पण मधेच त्याचे ग्रह-तारे कुठेतरी बिघडले. तसाही स्थानिक लोकांचा विरोध होताच. अहो एवढ्या लागणा-या आंबा, माडा-पोफळींच्या बागा टाकून विस्थापित होण्याची हौस कोणाला आहे? पण पिण्याच्या पाण्याची थोडीफार अडचण आहेच इकडे.

मस्त भूक लागली होती. गावात आलो आणि टपरीवजा हॉटेलात जेवणाची चौकशी केली तेव्हा कळालं की त्यांच्याकडे ५ दिवसांनी पाणी आलं होतं आणि पुढे कधी येईल ह्याची खात्री नव्हती. जेवणाचा बेत आपोआपच पुढे गेला.



पूर्वी मिठबांव म्हणजे समुद्रात घुसलेलं टोक होतं, खाडीपलिकडे मालवण तालुका. हल्लीच त्या खाडीवर मस्त ऐसपैस पूल झाला आहे. त्यामुळे जवळजवळ १००(एकावर दोन शून्यं) किलोमीटरचं अंतर वाचवून आम्ही आच-याला निघालो. आच-याच्या रामेश्वरावरही खूप लोकांची श्रद्धा आहे, पण आधी पोटोबा, मग विठोबा ह्या न्यायाने अगोदर जेवून घेतलं मग देवळात गेलो. ह्या देवस्थानाचं वाचनालय १०० वर्षांपेक्षाही जुनं आहे.
आता जायच होतं ते आच-याच्या बंदरावर. आचरा बंदरावर
जायला मधल्या दलदलीत भर टाकून केलेला अर्धा एक किलोमीटरचा पूलासारखा रस्ता आहे. रस्ता तसा पूर्वीही होताच. पण आता तो मस्त रुंद केला आहे. मधे मधे छोट्या चौपाट्याही केल्या आहेत आणि एखादं घर रंगवावं, तसा रंगवला आहे.

आच-याच्या किना-यावर पूर्वी माझ्या एका मित्राचे तंबू होते. त्यावेळी माझ्या कॉलेजमधले मित्र, विक्रम आणि
अमितबरोबर मी आलो होतो, ते दिवसही फार मिस होतात :( . सध्या तरी तिथे सामसूमच होती.
समुद्राला मात्र उधाण आलं होत. थोडा वेळ शांत बसलो. समुद्राचं रूप चार इंद्रियानी मनोसोक्त अनुभवलं (चव सोडून. कोकणात बरेच संत, विभूती झाल्या, पण कोणी समुद्राचं पाणी गोड केलेलं नाही, मुंबईचे बाबा त्यामानाने पॉवरबाज आहेत ;) ) इकडे तिकडे फोटो काढले. समुद्रात गेलेल्या होड्या यायला अजून बराच वेळ होता. त्यामुळे ताजे मासे घरी नेण्यासाठी फार वेळ थांबावं लागलं असतं.
त्या भानगडीत न पडता आम्ही गडनदीच्या कडेकडेने जाणारा परतीचा रस्ता पकडला. पावसात हा रस्ता अगदी अप्रतिम असतो, पण मे महिन्यातही नदीत पाणी होतं आणि बराच हिरवेपणाही होता.






तासाभरात घरी पोचलो.
पण मन मात्र किना-यावरंच भटकत राहिलेलं....

Comments

Neophyte said…
too good....
you have increased my nostalgia by a great magnitude...
this is the first summer in which I have been to home (Sawantwadi for less than a week)..
good work!
Vishal K said…
फोटो आणि वर्णन, एकदम सॉलिड.
शेवटही झकास.
वाचून तुझा खूप हेवा वाटला.
Anonymous said…
1 number lihile aahes....
Maja aali wachtana

- Abhijit Patil
Nandan said…
chhan lihila aahes. ugach senti hou n deta, paN chokh varNan karat. Vengurlyaache varNan puDhachyaa bhaagat yaayachee vaaT baghato aahe :D
Vidya Bhutkar said…
A post after long time. :-) Sahich lihile aahes. I liked the photos too. I could imagine the whole route and your thought process while seeing these things after long time. I think we become more aware of surrounding after coming back home.
You write very well. Hope to see more of it and sooner.
-Vidya.
Prashant Desai said…
khupach chhan lekh aahe. aani photos tar ekdam jhakas.. khush jhalo aapan.

mala visheshtah haa photo khupach aavadla..

http://bp3.blogger.com/_cFeQlvZCbJM/RlZgsN8zJJI/AAAAAAAAAAU/Z67uK8pd2OI/s1600-h/Pokharbaav+Temple.JPG
मस्त लिहीलं आहे. पुढचा भाग कधी येणार?
Vidya Bhutkar said…
"शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला.." :-)
Tujhi vachanakatha vachun pudhehi kahi vachaychi ichha jhali. Mhanun Nandan chya ch 'je je uttam' ya upakramasathi kho det aahe. :-D (Kay he lok sarkhe baher ubhya asalelya kheladula pan kho detat kalat nahi? asa mhanat asashil. ;-) Ho na? )
-Vidya.
Anonymous said…
खूप छान लिहिलंय. पुढच्या india trip मध्ये कोकणात जाण्याची कल्पना हळू-हळू मूळ धरायला लागली आहे :)
Unknown said…
khoop aathvan aali lahanpanichi... yapudhe tar mahitihi nahi Kokanat kitise jayla milel..geli 6-7 varsh jaanach nahi jhale Kankavlila.... faar vaatatay ki te sagle divas parat yaavet..... i just miss those days....
Unknown said…
चला मग जाऊया कुणकेश्वर यात्रेला

अधिक माहितीसाठी विजीत करा :Experience Tourism
Abhi said…
खूपच छान लिहिले आहेस अमित. वाचताना नकळत कोकणात फिरल्या सारखे वाटले. मागे एकदा अपूर्वाई आणि पूर्वरंग वाचले होते त्या नंतर ऐवडे सुदर वर्णन आजच वाचले. :)

- अभिजित सपकाळे
खूपच छान लिहिलं आहेस. अगदी स्वतः जाऊन आल्यासारखं वाटलं!

Popular posts from this blog

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links Part I Part II काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा.. अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :( बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही.. मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो.. आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली. पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या

.... अवघे धरू सुपंथ

सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग.  त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक.  पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली

माझी वाचनकथा

शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला.. सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;) ...अथवा पुढे वाचा (माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे). वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्या