शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला..
सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;)
...अथवा पुढे वाचा
(माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे).
वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्याची चिरफाड वाटे. नुसतंच वाचत जावं आणि त्यातच रमून जावं असं साधं सोपं आयुष्य असतं तर काय मजा आली असती! अनुभवाने सांगतोय, दहावीपर्यंत हे नशीब नव्हतं, पण अकरावी-बारावीत मराठी नव्हतं तरीही मी युवकभारती वाचून काढली, आणि त्या वाचनाचा आनंद अवर्णनीयच होता.
खर तर कुठल्याही वाचनाचा आनंद हा असाच असतो. ज्ञान मिळवण्यासाठीदेखील वाचावं लागतं, पण मग 'फक्त बर वाटतं' म्हणून जर एखादा वाचत असेल तर त्यातही काही चुकीचं नाही.
समीक्षक, परीक्षक लोकांची मला कधी कधी कींव येते, एवढं प्रचंड वाचन, पण त्यातून काही आनंद मिळतो की नाही देव जाणे.
तर मग फक्त बरं वाटावं म्हणून वाचत गेलो आणि पुस्तकांनी पण अगदी मन मोकळं केलं. काही पुस्तकांनी हसवलं, काहींनी रडवलं, काहींनी घाबरवलं, काहिंनी अस्वस्थ केलं, काहिंनी भडकवलं आणि काहिंनी बहकवलं.. आणि आजही कोणतही पुस्तक चांगलं की वाईट हे एकाच गोष्टीने ठरत- 'त्याने मनाला हात घातला का?'
तर आता थोडंफार त्या माझ्या प्रिय पुस्तकांबद्दल..
१. नुकतेच विकत घेतलेले पुस्तक (६ महिन्यांपूर्वी).
बहिणाबाईची गाणी
२. वाचले असल्यास, पुस्तकाबद्दल थोडेसे
:)
३. आवडलेली प्रभाव टाकणारी ५ पुस्तके.
कार्यरत - अनिल अवचट
गाडगेबाबा - गो. नि. दा.
समग्र पु. ल.
पार्टनर - व.पु.
दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
श्यामची आई, फास्टर फेणे, विज्ञान-राक्षस
आमचा पण गाव/एरंडाचे गु-हाळ - चि.वि. जोशी
घरभिंती
४. वाचायची आहेत अशी ५ पुस्तके..
बरीच आहेत .. पण नावं आठवत नाहीत.
५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.
कार्यरत ह्या अनिल अवचटांच्या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रात अतिशय साध्या, पण तितक्याच प्रभावी समाजकार्य करणा-या अनेक व्यक्त्तींबद्दल आणि त्यांच्या संस्था/चळवळी/उपक्रमांविषयी लिहिलेले आहे.
मी ह्यांना खो देतो आहे..
वसुद
विंचुरकरी
विवेक
सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;)
...अथवा पुढे वाचा
(माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे).
वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्याची चिरफाड वाटे. नुसतंच वाचत जावं आणि त्यातच रमून जावं असं साधं सोपं आयुष्य असतं तर काय मजा आली असती! अनुभवाने सांगतोय, दहावीपर्यंत हे नशीब नव्हतं, पण अकरावी-बारावीत मराठी नव्हतं तरीही मी युवकभारती वाचून काढली, आणि त्या वाचनाचा आनंद अवर्णनीयच होता.
खर तर कुठल्याही वाचनाचा आनंद हा असाच असतो. ज्ञान मिळवण्यासाठीदेखील वाचावं लागतं, पण मग 'फक्त बर वाटतं' म्हणून जर एखादा वाचत असेल तर त्यातही काही चुकीचं नाही.
समीक्षक, परीक्षक लोकांची मला कधी कधी कींव येते, एवढं प्रचंड वाचन, पण त्यातून काही आनंद मिळतो की नाही देव जाणे.
तर मग फक्त बरं वाटावं म्हणून वाचत गेलो आणि पुस्तकांनी पण अगदी मन मोकळं केलं. काही पुस्तकांनी हसवलं, काहींनी रडवलं, काहींनी घाबरवलं, काहिंनी अस्वस्थ केलं, काहिंनी भडकवलं आणि काहिंनी बहकवलं.. आणि आजही कोणतही पुस्तक चांगलं की वाईट हे एकाच गोष्टीने ठरत- 'त्याने मनाला हात घातला का?'
तर आता थोडंफार त्या माझ्या प्रिय पुस्तकांबद्दल..
१. नुकतेच विकत घेतलेले पुस्तक (६ महिन्यांपूर्वी).
बहिणाबाईची गाणी
२. वाचले असल्यास, पुस्तकाबद्दल थोडेसे
:)
३. आवडलेली प्रभाव टाकणारी ५ पुस्तके.
कार्यरत - अनिल अवचट
गाडगेबाबा - गो. नि. दा.
समग्र पु. ल.
पार्टनर - व.पु.
दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ
श्यामची आई, फास्टर फेणे, विज्ञान-राक्षस
आमचा पण गाव/एरंडाचे गु-हाळ - चि.वि. जोशी
घरभिंती
४. वाचायची आहेत अशी ५ पुस्तके..
बरीच आहेत .. पण नावं आठवत नाहीत.
५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे.
कार्यरत ह्या अनिल अवचटांच्या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रात अतिशय साध्या, पण तितक्याच प्रभावी समाजकार्य करणा-या अनेक व्यक्त्तींबद्दल आणि त्यांच्या संस्था/चळवळी/उपक्रमांविषयी लिहिलेले आहे.
मी ह्यांना खो देतो आहे..
वसुद
विंचुरकरी
विवेक
Comments
http://manaacha-shodh.blogspot.com/
thanks again
अवांतर - "पुस्तकनिष्ठांची मांदियाळी" संबंधीचा माझा लेख "काम चालू आहे" वर आहे.या लेखात दुसऱ्या ब्लॉगचा दुवा दिलेला आहेस.
I modified the link now :)