Skip to main content

Posts

.... अवघे धरू सुपंथ

सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग.  त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक.  पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली
Recent posts

वाकडच्या पाणी मोर्चाच्या निमित्ताने

कालचा (३ मार्च २०१८) पिंपरी - चिंचवड गृहनिर्माण सोसायट्यांच्या महासंघातर्फे आयोजित केलेला  मोर्चा हा खऱ्या अर्थाने वाकड मध्ये जागृती आणि चैतन्य निर्माण करणारा होता.  ह्या वर्षी पाऊस चांगला पडला आणि अगदी ऑकटोबर / नोव्हेंबर पर्यंत होता.  तरीही १ जानेवारी पासून अचानक पाणी पुरवठा अर्ध्यावर आला.  वाकड मधल्या अनेक संस्थांना पाण्याची समस्या आहेच, पण ज्यांना पाणी येत होते त्यांनाही पाणी येणे बंद झाले.   जर महानगर पालिकेच्या सबबींवर विश्वास ठेवायचा तर ३१ डिसेम्बर २०१७ रोजी एकतर सगळ्या पाईप लाईन्स आकुंचन पावल्या किंवा वाकड मध्ये २/३ लाख लोक एकदम एकाच दिवशी राहायला आले असा होतो.  महापालिका प्रशासन लोकांना वेडं समजत असावं बहुतेक. पण लोकांनी रस्तयावर उतरून आम्ही ही चालूगिरी सहन करणार नाही हे दाखवून दिले.  फेडरेशन चे देशमुख काका आपल्या भाषणात म्हणाले की हे IT वाले केशवसुतांना अभिप्रेत असलेले "लाडके " आहेत. दुर्दैवाने आज IT मध्ये ती परिस्थिती राहिली नाही :) . पण जमलेली लोकं लाडकी नसली तरी केशवसुतांचे "नवे शिपाई " नक्कीच होते.  आणि ह्या "नव्या मनूच्या,
गणपती बाप्पा मोरया  "हा रामेश्वर, म्हणजे शंकर, त्याचं मंदिर पूर्व-पश्चिम आहे. आणि हे विष्णूचं मंदिर माञ उत्तर-दक्षिण , म्हणजे त्याला आडवं आहे. इतकंच कशाला, विष्णू पण आडवा पहुडलेला आहे. हा काही योगायोग नाही.  ह्या मागे पण पूर्वजांनी फार विचार केला आहे. भोळ्या शंकरावर तो लक्ष ठेवून आहे. एखाद्या राक्षसाने काही वर मिळवला, की त्याला आडवं जाण्याचं काम त्याला करावं लागतं.", देवळातले गुरव पुराणातल्या गोष्टीचा असा रंगतदार खुलासा करत होते, पण माझं लक्ष सृष्टीदेवतेकडेच होतं.  गणपतीच्या दिवसांत तसंही  अवघ कोकण हिरव्या रंगात माखून जातं आणि त्यात आकेरीच्या  श्री रामेश्वर देवस्थानाचा परिसर तर खासच नटला होता.    नजर जाईल तिकडे पसरलेले गुढघाभर उंचीचे भाताचे हिरवेकंच तरवे, त्यांतून अखंड वाहणाऱ्या वहाळाचा खळखळाट ह्यांनी डोळे आणि कान तृप्त होतच होते, पण नुकत्याच पडून गेलेल्या सरीनंतर हवेत मस्त गारवा आला होता आणि अंगाशी खेळणाऱ्या वाऱ्याच्या झुळकी त्याची मजा अजूनच वाढवत होत्या. सूर्यदेवही इकडे तिकडे फिरणाऱ्या ढगांमागे आळसावला होता.  एकूणच गणपती बाप्प

मे महिना

शाळेत असताना माझा सगळ्यात आवडता महिना होता तो मे महिना! कारणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. निकाल लागलेला असल्याने पुढच्या वर्गात जाण्याची खात्री असायची, घरात सगळे नातेवाईक, पाहुणे असल्याने खेळायला/उनाडक्या करायला अख्खी टोळी असायची, त्यावेळी तरी पुढच्या वर्गांच्या शिकवण्या/संस्कार वर्ग/उन्हाळी शिबिरं असले काही प्रकार नव्हते आणि ह्या सगळ्याला असायची ती कोकणाची पार्श्वभूमी. आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद ह्यांचा रतीब, गाज ऐकत वेळेवर फिरणं, किल्ले बांधणं, शंख-शिंपले गोळा करणं, उकाड्याने हैराण झालो की एखादे काका/मामा आइस्क्रीम खायला देतील ह्या आशेवर राहणं, वळवाच्या पावसात चिंब होणं हे सगळं मनोसोक्त भोगायचे ते दिवस होते. इतक्या वर्षांनंतर परत मे महिन्यात कोकणात जायची संधी मिळाली. मारामारी करून कोड अप्रूव्ह करून घेतला आणि सरळ गोवा गाडी पकडून कणकवली गाठली. तसंही महिन्यातून एकदा जाणं होतंच, पण ते २, जास्तीत जास्त ३ दिवस. ह्या वेळी अख्खा आठवडा हातात होता. २ दिवस सिंधु-महोत्सव बघत आराम केला. कार्यक्रम/आयोजन चांगलं होतं पण मागच्याच आठवड्यात नाट्यमहोत्सवाची धमाल केलेल्या नाट्यवेड्या (नाट्यरसिक नव्हे)

माझी वाचनकथा

शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला.. सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;) ...अथवा पुढे वाचा (माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे). वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्या

केल्याने देशाटन..

'केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार' असं मी लहानपणापासून ऐकतो आहे.. पण माझ्या व्यवसायात चतुर माणसांनाच देशाटनाची संधी मिळत असल्याने आधी कोंबडी की आधी अंडे अशी गत होऊन, मी दोन्ही गोष्टींना बरेच दिवस पारखा होतो. शेवटी सत्राशे साठ भानगडी करून मी ऑनसाइटची संधी साधली़च. प्रेमात, युद्धात आणि धंद्यात सारं काही क्षम्य ;).. तर अमेरिकेत आल्यावर सगळ्यात जास्त प्राधान्य अर्थात फिरण्याला होतं. जास्त फिरणं = जास्त चातुर्य सरळ हिशोब. फिरण्यातही मी अशी गावं निवडली की जिकडे माझे (माझ्यासारखेच) चतुर मित्र-मैत्रिणी तळ ठोकून होते. वसंतागमानापर्यंत न्यू-यॉर्क/कनेक्टिकट अशा जवळपासच्या मित्रांना मित्रप्रेम दाखवून झाल्यावर मी मिड वेस्ट कडे मोर्चा वळवला. मे च्या मेमोरिअल डे च्या सुट्टीत शिकागो - ब्लूमिंग्टन - इंडी असा धावता दौरा आखला. ब्लूमिंग्टनमधे शिल्पा-मोहित ने नवीन घर घेतलं होतं, त्याच्या वास्तुशांतीच आग्रहाचं आमंत्रण असूनही मी जावू शकलो नव्हतो, त्यामुळे ती पार्टी वसूल करणं हा एक अंतस्थ हेतू होताच. शिकागो विमानतळावर सचिन, शिल्पा आणि मोहित मला घ्यायला येणार ह्या विचाराने मी निर्धास्त होतो, पण