गणपती बाप्पा मोरया
नजर जाईल तिकडे पसरलेले गुढघाभर उंचीचे भाताचे हिरवेकंच तरवे, त्यांतून अखंड वाहणाऱ्या वहाळाचा खळखळाट ह्यांनी डोळे आणि कान तृप्त होतच होते, पण नुकत्याच पडून गेलेल्या सरीनंतर हवेत मस्त गारवा आला होता आणि अंगाशी खेळणाऱ्या वाऱ्याच्या झुळकी त्याची मजा अजूनच वाढवत होत्या. सूर्यदेवही इकडे तिकडे फिरणाऱ्या ढगांमागे आळसावला होता.
एकूणच गणपती बाप्पाला पृथ्वीवरच्या वास्तव्यात त्याच्या स्वर्गातल्या घराची उणीव न भासावी असं काहीसं वातावरण होतं.
एकूणच गणपती बाप्पाला पृथ्वीवरच्या वास्तव्यात त्याच्या स्वर्गातल्या घराची उणीव न भासावी असं काहीसं वातावरण होतं.
आणि लाखो चाकरमान्यांसारखा मी एक, हे सुख शक्य तेवढे ओरपून घेत होतो.
काही झाले तरी हा गौरी - गणपतीचा सण म्हणजे वर्षभराचं री-चार्जिंगच ना! पण मंडळी, फक्त पर्यटन हाच एक हेतू नाही हां !
"हरी भजनाची आवड मोठी, धावत आलो उसळीसाठी" असं कोकणी माणूस आपल्या तिरकसपणाने म्हणेलही, पण भजनातं माञ देह-भान हरवून रंगून जाईल. तिथे 'आधी पोटोबा मग विठोबा 'असा प्रकार नाही. श्री देव ..... तमुक-तमुक ...... प्रासादिक भजनी मंडळ प्रत्येक वाडीत एक (आणि एकच ) असतं. पायपेटी, तबला डग्गा, दहा-बारा टाळकरी, एक झान्ज एवढा सरंजाम जोडीला असला की बुवांच्या अंगात पं भीमसेन जोशी संचारलेच. नमन ,अभंग, गवळ, गजर अश्या वेगवेगळ्या भक्ती गीतांचे प्रकार तर ऐकायला मिळतातच, पण सिने गीतांच्या चाली वरची गाणीही वर्ज्य नाहीत. रात्रीचे जेवण झाले की आधी ठरवलेल्या क्रमाने एका एका घरी जाऊन तास दीड तास भजनाचा कार्यक्र्म चालतो. मग चहा आणि उसळ/पोहे/करंज्यांनी श्रमपरिहार.
एका दिवशी (म्हणजे रात्री) ४-५ घरं घेऊन सात दिवसांत सगळी वाडी पूर्ण करायची. पहाटे ४-५ वाजेपर्यंत जागताना कोणाचा उत्साह तसूभरही कमी होत नाही. गावकरी/चाकरमानी ६-७ वर्षाच्या मुलांपासून सत्तरीच्या आजोबांपर्यंत सारे अगदी तल्लीन होऊन जातात.
काही झाले तरी हा गौरी - गणपतीचा सण म्हणजे वर्षभराचं री-चार्जिंगच ना! पण मंडळी, फक्त पर्यटन हाच एक हेतू नाही हां !
"हरी भजनाची आवड मोठी, धावत आलो उसळीसाठी" असं कोकणी माणूस आपल्या तिरकसपणाने म्हणेलही, पण भजनातं माञ देह-भान हरवून रंगून जाईल. तिथे 'आधी पोटोबा मग विठोबा 'असा प्रकार नाही. श्री देव ..... तमुक-तमुक ...... प्रासादिक भजनी मंडळ प्रत्येक वाडीत एक (आणि एकच ) असतं. पायपेटी, तबला डग्गा, दहा-बारा टाळकरी, एक झान्ज एवढा सरंजाम जोडीला असला की बुवांच्या अंगात पं भीमसेन जोशी संचारलेच. नमन ,अभंग, गवळ, गजर अश्या वेगवेगळ्या भक्ती गीतांचे प्रकार तर ऐकायला मिळतातच, पण सिने गीतांच्या चाली वरची गाणीही वर्ज्य नाहीत. रात्रीचे जेवण झाले की आधी ठरवलेल्या क्रमाने एका एका घरी जाऊन तास दीड तास भजनाचा कार्यक्र्म चालतो. मग चहा आणि उसळ/पोहे/करंज्यांनी श्रमपरिहार.
उसळीचे पातेलं |
एका दिवशी (म्हणजे रात्री) ४-५ घरं घेऊन सात दिवसांत सगळी वाडी पूर्ण करायची. पहाटे ४-५ वाजेपर्यंत जागताना कोणाचा उत्साह तसूभरही कमी होत नाही. गावकरी/चाकरमानी ६-७ वर्षाच्या मुलांपासून सत्तरीच्या आजोबांपर्यंत सारे अगदी तल्लीन होऊन जातात.
फुगडी हा बायकांचा प्रांत असला तरी मुलीही आजकाल भजनात दिसतात.
खरं तर समस्त भारतीय नारींप्रमाणे ह्या सणातही बायकांचीच मेहनत मोठी! साफसफाई, प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ, पूजेची तयारी ह्या सगळ्यातून आरती-भजनांना वेळ नाही मिळाला तर त्यात नवल ते काय? शिवाय येणारे/जाणारे, लहान मुलांचे कोड-कौतुक हे आलंच. लपंडाव खेळांना-या लहरी पावसावर मात करून कपडे सुकवणे हाच एक मोठा प्रोजेक्ट असतो. तरीही गणराया पुढे दोन घटका हात जोडताना भक्तीचा पूर कुठेही कमी नाही. त्यांच्या कामामुळेच सगळ्या पुरुषांना रात्रभर भजन करून दिवसा जागरण निवळणं शक्य होतं. पारंपरिक पदार्थ तर ठरलेले असतातच. पहिल्या दिवशी मोदक, मग दुसऱ्या दिवशी उंदीर मामांना खीर, शिरवाळे आणि नारळाचं दूध, करंज्या, उसळी, रान भाज्या ...... नाना तऱ्हा. रांगोळी घातलेल्या पंक्तीत, मग केळीच्या पानाला पण तृप्त झाल्यासारखं वाटून जातं, तेव्हा जीव आटवलेल्या बायकांना एक वेगळंच समाधान मिळत. गौर पुजताना मग त्यांची गाणी आणि फुगड्या होतातच.
लाडक्या बाप्पासाठी खाण्याची आणि गाण्याची अशी तयारी असताना, सजावटीचीही मोठी धांदल उडते. शक्य असेल तर सगळ्याच घराला रंगाचा एक हात बसतो. पूर्वी गणपतीमागच्या भिंतीवर नक्षीकाम रंगवणे हेही गणपती रंगविण्याएवढेच महत्त्वाचे होते. आता रंगीत कागदांनी आणि चकाचक कापडाने ते काम फार सोपे केले आहे.
ह्या धामधुमीत ७ दिवस कसेच जातात. गणपतींची जायची वेळ येते तेव्हा हातात तांदूळ घेऊन उभ्या असलेल्या कुटुंबाच्या वतीने वडीलधारे गाऱ्हाणं घालतात - "बा देवा म्हाराजा, सालाबादप्रमाणे जी काय वेडी वाकडी सेवा केली हा ती मान्य करून घे. जर काय चुकला आसात तर लेकरांका माफ कर आणि तुझी कृपाद्रीष्टी सगळ्यांवर अशीच रवांदे." "होय म्हाराजा" असं म्हणतां मग आवाज कातरतो आणि बाप्पांचा निरोप घ्यायच्या विचाराने जीव व्याकुळतो.
मोक्ष मिळो न मिळो, पण हे अप्रतिम निसर्ग सौन्दर्य, भक्तीमय वातावरण, चविष्ट पदार्थांची रेलचेल, आप्तेष्टांचा सहवास हे सारं असंच जन्मोजन्मी मिळत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना!
Comments