Skip to main content

वाकडच्या पाणी मोर्चाच्या निमित्ताने



कालचा (३ मार्च २०१८) पिंपरी - चिंचवड गृहनिर्माण सोसायट्यांच्या महासंघातर्फे आयोजित केलेला  मोर्चा हा खऱ्या अर्थाने वाकड मध्ये जागृती आणि चैतन्य निर्माण करणारा होता. 
ह्या वर्षी पाऊस चांगला पडला आणि अगदी ऑकटोबर / नोव्हेंबर पर्यंत होता. 
तरीही १ जानेवारी पासून अचानक पाणी पुरवठा अर्ध्यावर आला. 
वाकड मधल्या अनेक संस्थांना पाण्याची समस्या आहेच, पण ज्यांना पाणी येत होते त्यांनाही पाणी येणे बंद झाले.  
जर महानगर पालिकेच्या सबबींवर विश्वास ठेवायचा तर ३१ डिसेम्बर २०१७ रोजी एकतर सगळ्या पाईप लाईन्स आकुंचन पावल्या किंवा वाकड मध्ये २/३ लाख लोक एकदम एकाच दिवशी राहायला आले असा होतो. 
महापालिका प्रशासन लोकांना वेडं समजत असावं बहुतेक. पण लोकांनी रस्तयावर उतरून आम्ही ही चालूगिरी सहन करणार नाही हे दाखवून दिले. 



फेडरेशन चे देशमुख काका आपल्या भाषणात म्हणाले की हे IT वाले केशवसुतांना अभिप्रेत असलेले "लाडके " आहेत. दुर्दैवाने आज IT मध्ये ती परिस्थिती राहिली नाही :) . पण जमलेली लोकं लाडकी नसली तरी केशवसुतांचे "नवे शिपाई " नक्कीच होते. 
आणि ह्या "नव्या मनूच्या, नव्या दमाच्या शूर शिपायांना" एकत्र आणून त्यांच्यातील शक्तीचं रूपांतर विधायक चळवळीत करण्याचं सारं श्रेय्य हे फेडरेशनलाच जातं.  फेडरेशनच हे मोठं यश आहे आणि ते वाकड च्या प्रगती साठी फार मोलाचं आहे. 
त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार सुद्धा. 


खरं तर सकाळी घरातून निघताना मनात थोडी धाकधूक होती . मोर्चाला कमी लोकं तर नाही ना जमणार. पण सभेची गर्दी पाहून ती साफ पळून गेली. आपण आता "एकटे" नाही तर "एक" आहोत, ह्या चळवळीची शक्ती आपल्याबरोबर आहे हा हुरूप आला. 
खरंच फेडरेशनने फारच मोठं काम केले आहे. 
आता माघार नाही. 


सरफिरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है पाणी कितना पाइपलाइन - ए - कोर्पोरेशन है 


Comments

Popular posts from this blog

मे महिना

शाळेत असताना माझा सगळ्यात आवडता महिना होता तो मे महिना! कारणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. निकाल लागलेला असल्याने पुढच्या वर्गात जाण्याची खात्री असायची, घरात सगळे नातेवाईक, पाहुणे असल्याने खेळायला/उनाडक्या करायला अख्खी टोळी असायची, त्यावेळी तरी पुढच्या वर्गांच्या शिकवण्या/संस्कार वर्ग/उन्हाळी शिबिरं असले काही प्रकार नव्हते आणि ह्या सगळ्याला असायची ती कोकणाची पार्श्वभूमी. आंबे, फणस, काजू, जांभळं, करवंद ह्यांचा रतीब, गाज ऐकत वेळेवर फिरणं, किल्ले बांधणं, शंख-शिंपले गोळा करणं, उकाड्याने हैराण झालो की एखादे काका/मामा आइस्क्रीम खायला देतील ह्या आशेवर राहणं, वळवाच्या पावसात चिंब होणं हे सगळं मनोसोक्त भोगायचे ते दिवस होते. इतक्या वर्षांनंतर परत मे महिन्यात कोकणात जायची संधी मिळाली. मारामारी करून कोड अप्रूव्ह करून घेतला आणि सरळ गोवा गाडी पकडून कणकवली गाठली. तसंही महिन्यातून एकदा जाणं होतंच, पण ते २, जास्तीत जास्त ३ दिवस. ह्या वेळी अख्खा आठवडा हातात होता. २ दिवस सिंधु-महोत्सव बघत आराम केला. कार्यक्रम/आयोजन चांगलं होतं पण मागच्याच आठवड्यात नाट्यमहोत्सवाची धमाल केलेल्या नाट्यवेड्या (नाट्यरसिक नव्हे)...

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links Part I Part II काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा.. अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :( बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही.. मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो.. आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली. पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या ...

मार्गे दलाल पथ...

पैसा पैशाला ओढतो, असं ऐकून एक गरीब माणूस मंदिरात गेला, हातातला एक रुपया दानपेटीवर धरून वाट बघू लागला, आपण २-३ रुपये ओढले तरी काही कमी फायदा नाही असा त्याचा हिशोब होता. पाच एक मिनिटांतच त्याच्या हातातून तो रुपया सुटला आणि दानपेटीत गेला.. ते पाहून तो उद्गारला, "अरेच्च्या! पैसा पैशाला ओढतो हे खरं आहे.. पण कोणाचा पैसा कोणाच्या पैशाला ओढेल हे मात्र सांगता नाही येणार" लहानपणी ऐकलेल्या ह्या गोष्टीचा अर्थ मला शेअर-बाजारात नव्याने समजला... मी माझा पैसा घेऊन दुस-यांचा पैसा ओढायला जायचो, आणि दुसरेच माझा पैसा ओढत. मग कोणीतरी म्हणालं, 'अरे वेड्या, असं नसतं कधी. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकावा, सगळ्यांचा पैसा एकत्र येतो आणि मग win-win situation होते, सगळेच जण पैसा कमावतात.' Makes sense :D.. पैसा म्युच्युअल फंड मद्धे टाकला.. सगळयांचा पैसा एकत्र आला, पण दुर्दैवाने दुस-या MF ने फायदा कमवला, आमचा सगळ्यांचा पैसा त्यांनी ओढला, दुस-या MF वाल्या सगळ्यांनीच पैसा कमावला.. त्यांच्यासाठी खरच win-win situation झाली. Think Contra.. अशीही एक शेअर-बाजाराची Strategy आहे.. म्हणजे काय तर तुम्हाला एख...