Skip to main content

मुंबईचा फंडा..

काही काही गोष्टींच मुंबईशी अतूट नातं आहे. पाऊस हा त्यापैकीच एक.
पावसाच्या धो धो कोसळण्याचं मुंबईला काही अप्रूप नाही. दर वर्षीच जून-जुलै-ऑगस्ट आणि कधीतरी सप्टेंबर मधेसुध्दा तो प्रंचंड कोसळतो. अर्ध्या मुंबईत पाणी भरतं. सगळ्या लोकल्स ठप्प होतात. दूरध्वनी/भ्रमणध्वनी बंद पडतात. शाळा लवकर सोडल्या जातात, लोकं ऑफीस मधून ३ वाजताच पळतात. आपल्या जवळच्या लोकांची थोडीशी काळजीही वाटू लागते. पण मग संध्याकाळी उशिरा घरी पोहचून पावसाने भिजलेले कपडे बदलून लोक आरामात चहाचे घुटके मारत टी व्ही वर पावसाने काय काय प्रताप केले ते बघत बसतात. जोडीला कांदा भजी आणि बाहेर वाजणारा पाऊस असं कॉम्बिनेशन असेल तर मग दिवसभराचा ताण कुठल्या कुठे पळून जातो.
पण २६ जुलै २००५ चं पावसाचं कोसळणं काही वेगळंच होतं.. त्याचा वेग, आवेग, आवेश सारं काही अगदीच विलक्षण होतं. सारे विक्रम तोडून त्याने नवा इतिहास रचला. अर्थात वेधशाळेला त्याचा अंदाज कधीच लागत नाही, तो ह्यावेळीही लागण्याचा प्रश्नच नव्हता.
पण फक्त एकच दिवस. एकच दिवस कोसळण्याचा होता आणि २७ जुलै परत मुंबईकरांचा होता. एका दिवसात मुंबई सारं मागे टाकून परत आपल्या कामाला लागली.

मुंबईचा पावसासारखाच अविभाज्य भाग जर कोण असेल तर तो म्हणजे शेअर बाजार. पावसाएवढाच बेभरवशी. पावसाचं भाकीत जसं कोणी करू शकत नाही, तसंच आज सेन्सेक्स कुठे बंद होईल हेही कोणी कधी सांगू शकत नाही. सारे मोसमी वारे, कमी दाबाचे/जास्त दाबाचे पट्टे/तापमान उपग्रहाने पाठवलेली छायाचित्रे ह्यांच बरोबर विश्लेषण करूनही शेवटी हवामानाचा अंदाज चुकतो, तसाच कंपन्यांचे ताळेबंद, चलनवाढ, व्याजदर, कच्च्या तेलाचे दर, हे सगळं विचारत घेवून काढलेलं ऍनॅलिसिस ही चुकतच...

आणि काल तो ही कोसळला.
नुसताच कोसळला नाही, तर आडवा-उभा कोसळला. त्याने ना रिलायन्सला सोडलं, ना इन्फोसिसला, ना एल ऍन्ड टी ला. Correction की Corrision असं वाटण्याची वेळ आली.
पण गुंतवणूकदारांना हे कोसळणं नाही घाबरवू शकत. उलट जवळपास सा-यांना राहून राहून एकाच गोष्टीच वाईट वाटत होतं - सगळेच शेअर्स एवढे स्वस्त झालेत, पण हातात जास्त कॅश नाही. :-( ! ज्यांच्याकडे १०,००० होते त्यांना पण आणि ज्यांच्याकडे १,०००,००० होते त्यांना पण.
२ सोमवार काळे उजाडलेले म्हणून काय झालं? एक सोमवार तर चांगलाच उजाडेल.
निदान मला तरी वाटतंय ह्याही कोसळण्याला मागे टाकून परत बाजार वर जाईल. १८-१९ मे ची भरपाई २२ मे ला होईल.

फंडामेंटली तरी काहीच बदललेलं नाही..
अर्थव्यवस्थेचे फंडामेंटल्स तर तेवढेच भक्कम आहेत.

...आणि कोसळण्याला न घाबरणं हाही एक मुंबईचा फंडा आहेच. :)

Comments

hmm - pan paawasaacha kosalna kadhi kadhi changla asta, konalatari dilasa denara asta. tasa share bazaracha nahi. Mala tar watta apan paise guntavato ki share bazar aplyala guntavato?
share bazarat kon konachi guntavanuk karto hech ajun mala samajala nahi.
amity said…
:) do agree Prasu..
paN 'te' kosaLaN dilasa deNar navatach.. paavasaach aaNi share mkt ch..
borntodre@m said…
Good one Amity!!

The last line rocks!!

...आणि कोसळण्याला न घाबरणं हाही एक मुंबईचा फंडा आहेच. :)
Anonymous said…
खरंच! पावसाशिवाय मुंबईची कल्पनासुद्धा करवत नाही, इतकं त्या दोघांचं अतूट नातं आहे! असं म्हणतात की दर पावसाळ्यात किमान तीनदा तरी मजबूत पाऊस होतोच. त्यावेळी मात्र मजा-बिजा काही नसते, घरी कधी एकदाचं पोचतो असं होऊन जातं. पण घरी पोचल्यावर तू म्हटल्याप्रमाणे गरमागरम चहा पिण्यात वेगळीच मजा असते! oh! i miss mumbai so much!

Popular posts from this blog

मुक्काम पोस्ट बोस्टन..

If you can not see the MARATHI text below, then please use following links Part I Part II काल दुपारी (नेहमीप्रमाणे) काम नसल्याने खिडकीतून बाहेर बघत होतो..आभाळ कसं अगदी भरून आलेलं आणि सोसाट्याचा वाराही सुट्लेला.. क्षणभर वाटलं की मस्तपैकी टपरीवर जावून कटिंग चहा मारावा.. अशा वातावरणात चहाची तल्लफ येण्यात चूक काहीच नाही.. फक्त त्यासाठी कुठेतरी भारतात असायला हवा होतो.. :( बघता बघता बोस्टनमधे येवून तीन महिने होत आले.. पण खरं पाहू जाता फार दूर आलोयं असं वाटतं नाही.. आणि तसं वाटण्यासारखी परिस्थिती पण नाही.. मागच्याच शनिवारी माझा एक मित्र कणकवलीहून आला, येताना माझ्या आईने दिलेले बेसनचे लाडू घेवून आला.. लगेचच मी घरी फोन करून ते मिळाले म्हणून कळवलं.. आणि आईने पण नेहमीप्रमाणे, 'कसे झालेत?, सगळ्या मित्रांना दे' असं सांगितलं.. जणू काही मी सांगलीत हॉस्टेलमधेच होतो.. आणि ह्या शनिवारी तर न्यू इंग्लड होळी पण साजरी झाली. पुण्यातून कूल कॅब ने मंदारकडे निघालो तेव्हा जरा धाकधूक होती, टॅक्सीवाला रात्री ११ वाजता मुंबईत पोहचल्यावर उगीचच इकडे तिकडे फिरवून जास्त भाडं तर नाही ना मागणारं?, पण दिवसा ढवळ्या

.... अवघे धरू सुपंथ

सकाळचे साडे नऊ , धडाम! ८५५५, निफ्टी खालच्या वाटोळ्याला (सर्किट) निपचित पडला. अपशकुनी १३ तारखेचा शुक्रवार वाकुल्या दाखवत होता. पोर्टफोलिओ बघण्याची ना हिम्मत नव्हती आणि ना उपयोग.  त्याहीपेक्षा भांडवली बाजाराच्या विरोधकांमधील सर्वकालीन अग्रणींपैकी एक असलेल्या सौभाग्यवतींना काय तोंड द्यायचं ह्याचा विचार करून मेंदूचा भुगा होता.धीर करून तिच्या भरवशाच्या सोन्याचा दर बघितले , ते पण पडलेले ... जरा हायसं वाटलं. निदान - "तरी मी सांगत होते , शेअर्स वर पैसे लावण्यापेक्षा सोनं घे" हे ऐकून घ्यावं लागणार नाही. करोना विषाणू लागण झालेली लोकं कमी आणि गुंतवणूकदार जास्त मारणार हे खरं ठरणार बहुतेक.  पण तसाही सगळीकडे अक्षरश: हाहाकार माजला आहे. २१ व्या शतकात शहरं विलगित केली जातात हा धक्का पचण्याआधीच प्रांताच्या विलगीकरणाची आणि त्या मागोमाग देशांच्या सीमा बंद झाल्याच्या बातम्या धडकल्या. अगदीच अकल्पित घडलं. गुंतवणूकदारांचं सोडाच, पण सगळे उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.प्रवास, बाजारपेठा, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये ह्यांच्या बंदीमुळे आर्थिक चक्र थांबलं आहे. ऑलम्पिक सुद्धा रद्द करण्याची पाळी आली

माझी वाचनकथा

शशांकने खो दिल्यावर मी खरतर लगेचच पळायला पाहिजे होतं, पण आळस हा माणसाचा शत्रू आहे, शत्रूवरही प्रेम करा इत्यादी वाचलेल्या अनेक सुविचारांचा एकत्रित परिणाम झाल्याने आज मुहूर्त सापडला.. सर्वप्रथम ह्या सगळ्या प्रकाराबद्दल माझ्या मनात थोडी शंकाच आहे.. "तू जर ब्लॉग लिहितोस आणि स्वत:ला मराठी साहित्याचे उपासक समजतोस, तर मग सांग बघू काय काय वाचलय ते?" असं करणं म्हणजे "पोहता येत, तर मग जरा पाण्यात उडी मारून दाखव" ह्या धर्तीवर खिंडीत पकडणे होय. जर हा हेतू असेल तर मी तात्विक निषेध नोंदवतो आणि इथेच लिखाण थांबवतो, ;) ...अथवा पुढे वाचा (माफ करा पण आज्ञावल्या लिहून/वाचून if, else लिहायची सवय लागली आहे). वाचन हा सगळ्यात आवडता छंद. आणि लहानपणापासून मी हाती लागेल ते पुस्तक वाचायचो, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके दिवाळी अंक, कॉमिक्स, हे तर होतंच, पण सगळ्यात आवडीच्या पुस्तकांपैकी होती ती बालभारती, कुमारभारती. त्यांतले धडे फारच सुंदर होते, अर्थात परीक्षा नावाच्या एका राक्षसाने त्यातला आनंद अर्धा केला. संदर्भासह स्पष्टीकरण, कवितेचे रसग्रहण, भाषावैशिष्ट्ये असले प्रकार म्हणजे मला साहित्या