काही काही गोष्टींच मुंबईशी अतूट नातं आहे. पाऊस हा त्यापैकीच एक.
पावसाच्या धो धो कोसळण्याचं मुंबईला काही अप्रूप नाही. दर वर्षीच जून-जुलै-ऑगस्ट आणि कधीतरी सप्टेंबर मधेसुध्दा तो प्रंचंड कोसळतो. अर्ध्या मुंबईत पाणी भरतं. सगळ्या लोकल्स ठप्प होतात. दूरध्वनी/भ्रमणध्वनी बंद पडतात. शाळा लवकर सोडल्या जातात, लोकं ऑफीस मधून ३ वाजताच पळतात. आपल्या जवळच्या लोकांची थोडीशी काळजीही वाटू लागते. पण मग संध्याकाळी उशिरा घरी पोहचून पावसाने भिजलेले कपडे बदलून लोक आरामात चहाचे घुटके मारत टी व्ही वर पावसाने काय काय प्रताप केले ते बघत बसतात. जोडीला कांदा भजी आणि बाहेर वाजणारा पाऊस असं कॉम्बिनेशन असेल तर मग दिवसभराचा ताण कुठल्या कुठे पळून जातो.
पण २६ जुलै २००५ चं पावसाचं कोसळणं काही वेगळंच होतं.. त्याचा वेग, आवेग, आवेश सारं काही अगदीच विलक्षण होतं. सारे विक्रम तोडून त्याने नवा इतिहास रचला. अर्थात वेधशाळेला त्याचा अंदाज कधीच लागत नाही, तो ह्यावेळीही लागण्याचा प्रश्नच नव्हता.
पण फक्त एकच दिवस. एकच दिवस कोसळण्याचा होता आणि २७ जुलै परत मुंबईकरांचा होता. एका दिवसात मुंबई सारं मागे टाकून परत आपल्या कामाला लागली.
मुंबईचा पावसासारखाच अविभाज्य भाग जर कोण असेल तर तो म्हणजे शेअर बाजार. पावसाएवढाच बेभरवशी. पावसाचं भाकीत जसं कोणी करू शकत नाही, तसंच आज सेन्सेक्स कुठे बंद होईल हेही कोणी कधी सांगू शकत नाही. सारे मोसमी वारे, कमी दाबाचे/जास्त दाबाचे पट्टे/तापमान उपग्रहाने पाठवलेली छायाचित्रे ह्यांच बरोबर विश्लेषण करूनही शेवटी हवामानाचा अंदाज चुकतो, तसाच कंपन्यांचे ताळेबंद, चलनवाढ, व्याजदर, कच्च्या तेलाचे दर, हे सगळं विचारत घेवून काढलेलं ऍनॅलिसिस ही चुकतच...
आणि काल तो ही कोसळला.
नुसताच कोसळला नाही, तर आडवा-उभा कोसळला. त्याने ना रिलायन्सला सोडलं, ना इन्फोसिसला, ना एल ऍन्ड टी ला. Correction की Corrision असं वाटण्याची वेळ आली.
पण गुंतवणूकदारांना हे कोसळणं नाही घाबरवू शकत. उलट जवळपास सा-यांना राहून राहून एकाच गोष्टीच वाईट वाटत होतं - सगळेच शेअर्स एवढे स्वस्त झालेत, पण हातात जास्त कॅश नाही. :-( ! ज्यांच्याकडे १०,००० होते त्यांना पण आणि ज्यांच्याकडे १,०००,००० होते त्यांना पण.
२ सोमवार काळे उजाडलेले म्हणून काय झालं? एक सोमवार तर चांगलाच उजाडेल.
निदान मला तरी वाटतंय ह्याही कोसळण्याला मागे टाकून परत बाजार वर जाईल. १८-१९ मे ची भरपाई २२ मे ला होईल.
फंडामेंटली तरी काहीच बदललेलं नाही..
अर्थव्यवस्थेचे फंडामेंटल्स तर तेवढेच भक्कम आहेत.
...आणि कोसळण्याला न घाबरणं हाही एक मुंबईचा फंडा आहेच. :)
पावसाच्या धो धो कोसळण्याचं मुंबईला काही अप्रूप नाही. दर वर्षीच जून-जुलै-ऑगस्ट आणि कधीतरी सप्टेंबर मधेसुध्दा तो प्रंचंड कोसळतो. अर्ध्या मुंबईत पाणी भरतं. सगळ्या लोकल्स ठप्प होतात. दूरध्वनी/भ्रमणध्वनी बंद पडतात. शाळा लवकर सोडल्या जातात, लोकं ऑफीस मधून ३ वाजताच पळतात. आपल्या जवळच्या लोकांची थोडीशी काळजीही वाटू लागते. पण मग संध्याकाळी उशिरा घरी पोहचून पावसाने भिजलेले कपडे बदलून लोक आरामात चहाचे घुटके मारत टी व्ही वर पावसाने काय काय प्रताप केले ते बघत बसतात. जोडीला कांदा भजी आणि बाहेर वाजणारा पाऊस असं कॉम्बिनेशन असेल तर मग दिवसभराचा ताण कुठल्या कुठे पळून जातो.
पण २६ जुलै २००५ चं पावसाचं कोसळणं काही वेगळंच होतं.. त्याचा वेग, आवेग, आवेश सारं काही अगदीच विलक्षण होतं. सारे विक्रम तोडून त्याने नवा इतिहास रचला. अर्थात वेधशाळेला त्याचा अंदाज कधीच लागत नाही, तो ह्यावेळीही लागण्याचा प्रश्नच नव्हता.
पण फक्त एकच दिवस. एकच दिवस कोसळण्याचा होता आणि २७ जुलै परत मुंबईकरांचा होता. एका दिवसात मुंबई सारं मागे टाकून परत आपल्या कामाला लागली.
मुंबईचा पावसासारखाच अविभाज्य भाग जर कोण असेल तर तो म्हणजे शेअर बाजार. पावसाएवढाच बेभरवशी. पावसाचं भाकीत जसं कोणी करू शकत नाही, तसंच आज सेन्सेक्स कुठे बंद होईल हेही कोणी कधी सांगू शकत नाही. सारे मोसमी वारे, कमी दाबाचे/जास्त दाबाचे पट्टे/तापमान उपग्रहाने पाठवलेली छायाचित्रे ह्यांच बरोबर विश्लेषण करूनही शेवटी हवामानाचा अंदाज चुकतो, तसाच कंपन्यांचे ताळेबंद, चलनवाढ, व्याजदर, कच्च्या तेलाचे दर, हे सगळं विचारत घेवून काढलेलं ऍनॅलिसिस ही चुकतच...
आणि काल तो ही कोसळला.
नुसताच कोसळला नाही, तर आडवा-उभा कोसळला. त्याने ना रिलायन्सला सोडलं, ना इन्फोसिसला, ना एल ऍन्ड टी ला. Correction की Corrision असं वाटण्याची वेळ आली.
पण गुंतवणूकदारांना हे कोसळणं नाही घाबरवू शकत. उलट जवळपास सा-यांना राहून राहून एकाच गोष्टीच वाईट वाटत होतं - सगळेच शेअर्स एवढे स्वस्त झालेत, पण हातात जास्त कॅश नाही. :-( ! ज्यांच्याकडे १०,००० होते त्यांना पण आणि ज्यांच्याकडे १,०००,००० होते त्यांना पण.
२ सोमवार काळे उजाडलेले म्हणून काय झालं? एक सोमवार तर चांगलाच उजाडेल.
निदान मला तरी वाटतंय ह्याही कोसळण्याला मागे टाकून परत बाजार वर जाईल. १८-१९ मे ची भरपाई २२ मे ला होईल.
फंडामेंटली तरी काहीच बदललेलं नाही..
अर्थव्यवस्थेचे फंडामेंटल्स तर तेवढेच भक्कम आहेत.
...आणि कोसळण्याला न घाबरणं हाही एक मुंबईचा फंडा आहेच. :)
Comments
paN 'te' kosaLaN dilasa deNar navatach.. paavasaach aaNi share mkt ch..
The last line rocks!!
...आणि कोसळण्याला न घाबरणं हाही एक मुंबईचा फंडा आहेच. :)